News Bharati

Team NB Marathi

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली […]

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत

भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. २३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा Read More »

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय Read More »

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील, असे मत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विश्व संवाद

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर Read More »

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे Read More »

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल

परदेशात घडलेल्या घोटाळ्यांचा अगदी लहानसा उल्लेख आपण आपल्या येथील वृत्तपत्रात वाचतो. (अर्थात याबद्दलची अगदी सविस्तर माहिती सुदैवाने सहजपणे माहितीच्या आंतरजालात उपलब्ध आहे.) ग्रूमिंग गँग घोटाळ्या सारखेच या घोटाळ्यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या लहानशा बातमीने देखील माझे लक्ष वेधून घेतले. जसे जसे याबद्दल अधिक माहिती मिळत गेली, तसे मनात संताप, ताण व वैफल्य अशी संमिश्र भावना निर्माण होऊ

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल Read More »