News Bharati

Maharashtra

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

\”ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असणे आवश्यकच आहे.स्वराज्याच्या रक्षणासाठी सुसज्ज, बळकट आरमार उभारण्याची गरज शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यामुळे स्वराज्याचे आरमार हा आजच्या आधुनिक भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे. आरमार […]

ज्याचे आरमार त्याचा समुद्र.. Read More »

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे. खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे तसेच या वस्तूंचा वापर वाढावा या उद्देशाने पुण्यात ‘स्वदेशी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांकडून या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव Read More »

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\”

भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. समाजातील सज्जन शक्तीला सोबत घेऊन भटके विमुक्तांचे सर्वेक्षण आणि त्यांना मूलभूत कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या. समाजाला बरोबर घेऊन हे काम केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\” Read More »

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत

अनाथ मुलांसाठी वैयक्तिक स्तरावर आगळे-वेगळे काम करणाऱ्या सेवाभावी गृहिणी अशी सुषमा गोडबोले यांची ओळख आहे. अनाथ मुलांना दरवर्षी नवीन कपडे शिवून देण्याच्या त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असाच. एका छंदातून सुरू झालेल्या त्यांच्या या उपक्रमाची ओळख अनेकांना निश्चितच प्रेरणा देईल. जीवन जगताना प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो. आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यकही असतो. पण, या

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत Read More »

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी

डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची ही ओळख. धर्मशास्त्र हा विषय केवळ संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असलेल्या संशोधक म्हणून डाॅ. आर्या जोशी यांची ओळख सांगता येईल. धर्मशास्त्र संस्कृत ग्रंथांमध्ये

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी Read More »

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे

देणगीदार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला देणे समाजाचे हा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. देणे समाजाचे हे प्रदर्शन रविववारपर्यंत (१४ सप्टेंबर) निवारा सभागृह, नवी पेठ येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत खुले आहे. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते. दान करण्यासाठी

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे Read More »

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान

‘दृष्टी’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित“राजकारणातील महिलांचा सहभाग” या विशेषांकाच्या मराठी व हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शेवाळवाडीच्या माजी सरपंच सुमन थोरात आणि पिंपरी दुमाळा (शिरूर) येथील माजी सरपंच गायत्री चिखले यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सरपंच ते खासदार अशा विविध स्तरांवरील

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »