News Bharati

महिला

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा

भारतीय शेतीव्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवस्थापन अशा जवळपास प्रत्येक कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, प्रत्यक्ष शेती करूनही जमिनीची मालकी त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अधिकृतपणे \”शेतकरी\” म्हणून मान्यता मिळत नाही. परिणामी पीक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, नुकसान भरपाई, किसान क्रेडिट कार्ड आणि विविध शासकीय योजनांच्या […]

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा Read More »

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू

उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचा उद्देश महिला प्राध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू Read More »

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना

आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच बाब ओळखून राज्य शासनाने एकल महिलांच्या हक्क, सुरक्षा आणि शाश्वत सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘एकल महिला धोरणा’च्या (Single Women Policy) निर्मितीसाठी

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना Read More »

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज

स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट याने आपल्यापैकी बहुतांश जणांचे आयुष्य व्यापले आहे. मोबाइल हातात नसेल तर आपले जगणे अशक्य आहे की काय असे वाटण्याइतकी वेळ आली आहे. जगभरातल्या सततच्या बातम्या, विविध इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारी माहिती, एकमेकांशी ऑनलाइन

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज Read More »

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या

अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये समोर आलेल्या दोन घटनांनी हा लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या घटनांमधून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, भावनिक दडपण, विश्वास संपादन आणि त्यानंतर निर्माण होणारा प्रभाव

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या Read More »

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज

आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच समोर आलेली मुंबईतील गर्भपाताची आकडेवारी, विनयभंगाची वाढती प्रकरणे आणि कोल्हापूरचे सामूहिक बलात्काराचे प्रकरण या घटना केवळ कायदा-व्यवस्थेपुढील आव्हान नसून आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर लक्षणे आहेत. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज Read More »

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो स्थलांतरित मजुरांचे कष्ट दडलेले आहेत. विशेषतः मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गरीब आणि दुष्काळग्रस्त कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील साखर

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय Read More »

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार

वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी वरळीत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काढण्यात आली होती. एका महिलेने रॅलीमुळे रस्ता अडवला गेल्याने आणि तिला तिच्या मुलाला शाळेतून आणायला उशीर होत असल्याने संताप व्यक्त

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार Read More »

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’

‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे.

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’ Read More »

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट – २०२५-२६’ या भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ आज, २१ मार्च २०२६

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन Read More »