News Bharati

हिंदुत्व

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा!

शिवसेना आणि फूट हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राहिलेले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर मोठे घाव घातले आहेत. पक्षाबाहेर पडलेल्या गणेश नाईक यांच्यासारख्या महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांचीही यादी छोटी नाही. पण ज्या दिवशी हा ऐतिहासिक पक्ष स्थापनेची साठ वर्षे पुरी करत आहे; त्याच दिवशी पुन्हा […]

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा! Read More »

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे” या आपल्या ऐतिहासिक निरीक्षणाचा पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार केवळ न्यायालयीन पुनरुच्चार नाही. हे एक सांस्कृतिक समर्थन आहे. अशा वेळी, जेव्हा हिंदुत्वाला संकुचित राजकीय चष्म्यातून चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे, तेव्हा न्यायालयाने बुधवारी शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताच्या ऐतिहासिक आणि तात्विक जाणीवेमध्ये खोलवर रुजलेले सत्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार Read More »

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर:

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. विविध प्रलोभने आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या ६५६ कुटुंबांतील ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू (सनातन) धर्मात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे पार

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश Read More »

हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…   

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर विचारांची लढाई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. परंतु, अलीकडच्या काळात या लढाईचे स्वरूप बदलून ते वैयक्तिक द्वेष, अर्वाच्य भाषा आणि थेट शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचले आहे. पुणे येथे पुढारी वृत्तसंस्थेच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात झालेला संघर्ष ही केवळ दोन व्यक्तींमधील हाणामारी नसून ती प्रामुख्याने महाराष्ट्राच्या

हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…    Read More »

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘The Great Indian Kapil Show’ सध्या जगभरात चर्चेत आहे. मात्र, या शोच्या आगामी भागावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार, मंत्री नितेश राणे यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या या शोमधील सहभागावर तीव्र आक्षेप घेत शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले Read More »