News Bharati

संपादकीय

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य

पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतन अग्रवाल या तरुणाला त्याचीच वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ढकलून ठार मारल्याची घटना म्हणजे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही. हा आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेत आणि आपल्या सामाजिक जडणघडणीत कुठेतरी गंभीर बिघाड झाल्याचा चिंताजनक आणि भीषण धोक्याचा इशारा आहे. या मुलीचे वय अवघे वीस वर्षे! ज्या […]

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य Read More »

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सभागृह हे राज्याला दिशा देणारे, कायदे करणारे आणि १४ कोटी जनतेच्या सार्वभौम अधिकारांचे रक्षण करणारे पवित्र स्थान आहे. परंतु, याच सभागृहात जेव्हा काही सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना बाजूला सारून धार्मिक ग्रंथांचे आणि मध्ययुगीन ‘शरिया’ कायद्यांचे गोडवे गाऊ लागतात, तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेची आणि लोकशाहीची मान शरमेने खाली जाते. नाशिकमधील

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का? Read More »

मराठीची ‘सर्वोच्च’ अवहेलना!

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला आणि लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला प्रगल्भ वैचारिक परंपरा लाभली आहे. आचार्य प्र. के. अत्रे, यशवंतराव चव्हाण, रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून ते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक दिग्गज वक्त्यांनी आपल्या अस्खलित, धारदार आणि वजनदार मराठीने महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवली. विरोधकांवर बोचरी, टोकदार टीका करतानाही भाषेचा बाज, व्याकरणाचा कणा आणि सुसंस्कृतपणा कसा राखायचा, याचा वस्तुपाठ

मराठीची ‘सर्वोच्च’ अवहेलना! Read More »

नव्या महाराष्ट्राची स्वप्ने

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोमवारचा दिवस एका नव्या पर्वाची नांदी ठरणारा आहे. आज म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, परंतु दोन्ही सभागृहांचे चित्र बदललेल्या महाराष्ट्राच्या नव्या राजकीय वास्तवाची प्रकर्षाने जाणीव करून देणारे आहे. गेल्या काही काळातील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर आज सत्ताधारी महायुतीकडे अभूतपूर्व आणि निर्विवाद असे संख्याबळ आहे. याउलट, कधीकाळी सभागृह डोक्यावर घेणारे

नव्या महाराष्ट्राची स्वप्ने Read More »

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा!

शिवसेना आणि फूट हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राहिलेले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर मोठे घाव घातले आहेत. पक्षाबाहेर पडलेल्या गणेश नाईक यांच्यासारख्या महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांचीही यादी छोटी नाही. पण ज्या दिवशी हा ऐतिहासिक पक्ष स्थापनेची साठ वर्षे पुरी करत आहे; त्याच दिवशी पुन्हा

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा! Read More »

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक…

मुंबईच्या फोर्ट भागात दिमाखात उभी असलेली, ग्रीको-रोमन स्थापत्यशैलीची ती पांढरीशुभ्र वास्तू म्हणजे केवळ पर्यटकांच्या फोटोग्राफीचे ‘बॅकड्रॉप’ नाही. त्या भव्य पायऱ्यांच्या मागे आपल्या अडीचशे वर्षांच्या बौद्धिक अस्मितेचा, ज्ञानाचा आणि इतिहासाचा एक सुवर्णकाळ दडलेला आहे. पण आज त्याच १८०४ साली स्थापन झालेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायरीतळावरून आत डोकावले, की जे चित्र दिसते ते वैभवाचे नाही

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक… Read More »

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य

जागतिक राजकारणाच्या पटावर पश्चिम आशियातील तणाव जेव्हा जेव्हा टोकाला जातो, तेव्हा त्याचे थेट पडसाद केवळ जागतिक राजकीय वर्तुळातच उमटत नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या धमन्याही त्यामुळे आकुंचन पावतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ, धुमसता संघर्ष संपूर्ण जगाला चिंतेच्या गर्तेत ढकलत होता. त्यामुळे आता शांततेच्या दिशेने पडणारी पावले ही केवळ अमेरिका व इराण यांच्यातली तडजोड ठरत नाही.

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य Read More »

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’

महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत जेवढे धक्के पचवले आहेत, तेवढे कदाचित देशातील इतर कोणत्याही राज्याने पाहिले नसतील. निवडणुका होतात, निकाल लागतात, जनतेचा कौल येतो; पण राजकारणाची नवनवीन गणित चालूच असतात. निवडणुकांच्या मैदानात लागणारे निकाल आणि त्यानंतर पडद्यामागे रचली जाणारी गणिते यात आता जमीन-अस्मानाचा फरक पडू लागला आहे. सध्या राज्यातील आणि देशातील राजकीय पडद्यामागे जे काही

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’ Read More »

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा!

सध्या काँग्रेसच्या विविध अवतारांच्या एकीकरणाची आणि विखुरलेल्या विरोधी पक्षांना एका छताखाली आणण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वायएसआर काँग्रेससारखे पक्ष हे मुळात काँग्रेसच्याच विशाल वृक्षापासून वेगळे झालेले फुटवे आहेत, हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यामुळे तत्त्वतः या सर्व ‘काँग्रेसधर्मी’ पक्षांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक वाटू शकते. परंतु, व्यावहारिक राजकारणात केवळ

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा! Read More »

या विनोदाच्या मुसक्या आवळा!

एक बाजूला मराठी साहित्याचा सुवर्णकाळ ज्यांच्या नावाभोवती रेंगाळतो, ज्यांनी महाराष्ट्राला निर्मळ, सुसंस्कृत आणि सात्त्विक विनोदाची अमूल्य देणगी दिली, त्या भाईंचा—म्हणजेच पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन! आणि नेमक्या याच काळात, दुसरीकडे एक मराठी तरुण एका तथाकथित कॉमेडी शोच्या माध्यमातून अश्लीलतेचा, बीभत्सतेचा आणि थिल्लरपणाचा डोस महाराष्ट्राला पाजत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर आपल्या

या विनोदाच्या मुसक्या आवळा! Read More »