News Bharati

आर्थिक

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत

मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले, […]

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत Read More »

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात केलेल्या कर्जावरच्या व्याज दरकपातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ८५ हजाराची पातळी ओलांडली तर निफ्टीनेही २५ हजार ९७९ अंकांची विक्रमी वाढ नोंदवली.

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक Read More »

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस – वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील, तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डांचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईततल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ Read More »

Government : 12.5 टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारने (government) खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे. हा साठा पूर्णपणे संपत नाही. तो पर्यंत किरकोळ खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खाद्यतेलाच्या दरनिश्चितीबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षेतखाली काल नवी दिल्ली इथं एका

Government : 12.5 टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन Read More »

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळपुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.  मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट्य या समितीपुढे ठेवलं आहे. या

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन Read More »

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंदकेल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७ हजारमोबाईल संचदेखील ब्लॉक केले आहेत. ‘संचार साथी’ च्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहितीमिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं. गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्यायादीत टाकलं आहे.

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी Read More »

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी एआय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे एआय कारखाने युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटरच्यानेटवर्कभोवती तयार केले जातील आणि स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधक यांना त्याचा लाभ घेतायेईल. याशिवाय हे ए आय कारखाने युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या ए आय उपक्रमांशी

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन Read More »

भारत सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान

भारत लवकरच सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींच्या हस्ते आज( बुधवारी) उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, करोडो भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेमीकंडक्टर हे एकमाध्यम आहे. आज भारत सेमीकंडक्टरचा प्रमुख ग्राहक आहे.

भारत सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान Read More »

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे पाच कोटी रोजगार निर्माण होतील असंही ते म्हणाले. आज नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी Read More »