News Bharati

Team NB Marathi

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका कठोर राष्ट्रीय धोरणाचे प्रतीक आहे, जे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन करण्यास नकार देते आणि पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला अंतहीन राजनैतिक संयमाने उत्तर देण्यावर आता विश्वास ठेवत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हे स्पष्ट […]

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण Read More »

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोलीच्या भूमीतून एका तरुणाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. तो महान योद्धा म्हणजे ‘वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके’. आजच्या पिढीला बाबुरावांचा हा प्रेरणादायी लढा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास Read More »

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी 

नाशिक, ज्या प्राचीन नगरीला ‘दक्षिण काशी’, ‘गंगाद्वार’ किंवा ‘रामजनक भूमी’ असे गौरवपूर्ण संबोधन लाभले आहे, त्या पवित्र क्षेत्रातील ऐतिहासिक काळाराम मंदिरावर बुधवारी सायंकाळी ४.४४ वाजता धर्मध्वजारोहणाचा अत्यंत भावपूर्ण आणि ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फूट उंचीच्या ब्रास धर्मस्तंभावर ५ फूट × ११ फूट

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी  Read More »

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर

‘समरसता’ ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला ‘समरसता मार्च’ हे याचे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दलित चळवळीने (विशेषतः दलित पँथरने) प्रस्थापित हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष करून आपली एक ‘समांतर व्यवस्था’ उभी केली. या व्यवस्थेने दलित साहित्य, कला आणि संस्कृतीला स्वतंत्र

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर Read More »

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. \”विठ्ठलभक्ती \” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत Read More »

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे

महाराष्ट्र राज्य भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या दशकात, विशेषतः २०१५ ते २०२६ या कालखंडात, राज्याने ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. पारंपरिक कोळशावरील अवलंबित्व कमी करत राज्याने नवीकरणीय ऊर्जेकडे वेगाने वाटचाल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रेसिडेंशियल रूफटॉप सोलार

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे Read More »

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ

शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर (Post-HSC) अभ्यासक्रम करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ करण्यात आली

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ Read More »

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ५ मे २०२६ हा दिवस आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांच्या संदर्भात एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. राज्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गती मंदावू नये, यासाठी २४

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय Read More »

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »