News Bharati

महाराष्ट्र

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : \”पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र […]

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं! Read More »

‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘”

पुणे, कराड, सोलापूर, संभाजीनगरसह नागपुरात बंधुता परिषद बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेची समाजाला गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी पुण्यात व्यक्त केले. सामाजिक समरसता मंच आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात पेरूगेट भावे

‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘” Read More »

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

परभणी: \”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’ Read More »

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : \”आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन Read More »

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १०

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात… त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे १३ खासदार देखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव साहेबांना हे कळूदेखील नये?… आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये?… माझ्या तर काही लक्षातच येत नव्हते… डोळ्यासमोर अंधार आणि मनात घोर निराशा… अशी माझी \”सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही\” अशी

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १० Read More »

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल!

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास; कराडमध्ये बंधुता परिषद महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. बंधुता परिषदांसारखा उपक्रम महत्त्वाचा असून त्यातून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे आयोजित बंधुता परिषदेत बोलताना व्यक्त केला. कराड येथील भवानी मैदानात ‘बंधुता परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. २

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल! Read More »

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ !

मुंबई : शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज घेताना लागणारे संपूर्ण मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि तारण शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत राजपत्र (Gazette) महसूल विभागाने

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ ! Read More »