News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा […]

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!

पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन! Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

जेजुरी गडावरील महाशिवरात्र : श्रद्धेचा महासंगम

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नानापरिची रचना रचिली अपार । जेजुरी गड हा केवळ महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण देशातील एक अनोखे तीर्थक्षेत्र आहे. कैलास पर्वतानंतर येथेच शिव आणि पार्वती यांचे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते, ही एक विलक्षण गोष्ट आहे. म्हणूनच जेजुरीला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत

जेजुरी गडावरील महाशिवरात्र : श्रद्धेचा महासंगम Read More »

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव (Shevgaon) येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकीत स्वतः मतदान करावे व हिंदू बांधवांकडूनही मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. गरज लागल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत मदत करावी, असे त्यांनी

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज Read More »