News Bharati

मराठवाडा

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा

गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गंगाखेडच्या (Gangakhed) राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन स्थापन झालेल्या गंगाखेड विकास आघाडीने (Gangakhed Vikas Aghadi) नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी गोपाळदास तापडिया यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन गंगाखेड विकास […]

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा Read More »

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे ‘संत संमेलना’चे (SANT SAMMELAN) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात हे संमेलन होणार आहे. हे संमेलन समाजातील विसंगती दूर करून श्रद्धा, नैतिकता आणि त्याग यांसारख्या मूल्यांवर आधारित जीवन

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार

मुंबई : मराठवाड्यातील (Marathwada) ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार Read More »

टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीवरच फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शेततळ्याचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार भरत नवनाथ खेडकर

टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल Read More »

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

नांदेड : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस (Rain) सुरू आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश Read More »

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले (ShivendraRaje Bhonsle) यांनी दिले. शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले Read More »

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!

परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी! Read More »