News Bharati

कोकण

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूकांसाठी अर्ज भरायची तारीख २३ ते ३० डिसेंबर २०२५. अर्ज पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे. […]

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू Read More »

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भगवान बिरसा कलासंगम‘ राज्यस्तरीय कार्यक्रम कोकण विभागात उत्साहात संपन्न झाला. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातील ४७ जनजातींच्या महान संस्कृती आणि श्रेष्ठ कला परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता Read More »

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख. गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी,

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई (Mumbai) येथून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी प्रवासी वाहतूक मार्गास मान्यता मिळाली आहे. कोकणवासीयांसाठी प्रथमच सुरू होणारी ही सेवा क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. माझगाव येथील भाऊचा धक्का येथे ‘एम टू एम प्रिन्सेस’ या रो-रो कंपनीच्या प्रवासी वाहतूक सेवेच्या पूर्वतयारीची पाहणी

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार Read More »

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने आता

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »