News Bharati

कोकण

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो!

मुंबई : \”मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार आहोत. १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, १६ तारखेपासून तुमच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. […]

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो! Read More »

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल!

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास; कराडमध्ये बंधुता परिषद महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. बंधुता परिषदांसारखा उपक्रम महत्त्वाचा असून त्यातून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे आयोजित बंधुता परिषदेत बोलताना व्यक्त केला. कराड येथील भवानी मैदानात ‘बंधुता परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. २

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल! Read More »

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. \”मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, २ जानेवारी रोजी‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार पेठेतील भवानी मैदान, पंतांचा कोट येथे होणार आहे. याच ठिकाणी २ जानेवारी १९४० रोजी डॉ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’ Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध!

कल्याण/डोंबिवली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक अशा दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. १. प्रभाग २६ (क): आसावरी नवरेडोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध! Read More »

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. \”मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे. केशव

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले Read More »

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३० डिसेंबर) चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अनेक दिवसांच्या रस्सीखेच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबईतील एकूण

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार Read More »

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता असून त्यासाठी पुरंदर विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून आधुनिक कार्गो सुविधांनी सुसज्ज असल्याने नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान दोन टक्क्यांची

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका  उबाठा गट आणि मनसे या दोन पक्षांचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न Read More »