News Bharati

Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!

पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन! Read More »

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात अधिक गती आणण्यासाठी आणि न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची (New Criminal Laws) प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यात नवीन फौजदारी

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Read More »

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या विपुल सर्जनाला आपण संतसाहित्य म्हणून ओळखतो. हे साहित्य केवळ धार्मिक अभिव्यक्ती नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची शक्तीही होते. संतांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीसाठी वाहून घेतले. त्यासोबतच  अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती,

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण 

तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची शक्ती क्षीण होत चालली होती. अशा काळात जेव्हा हिंदू समाजाला आत्मविस्मृती आणि अंतर्गत भेदभावांनी ग्रासले होते, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ लिहून केवळ भगवद्गीतेवर भाष्य केले नाही, तर एका दूरगामी

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण  Read More »

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. शतकानुशतकांची परंपरा असलेली ही वारी अनेक संकटांना तोंड देत अखंडित सुरू आहे. मुस्लिम आक्रमणांच्या काळातही

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता Read More »

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट उत्सव आहे. शतकानुशतके ही परंपरा लाखो भाविकांना पंढरपूरच्या विठोबा चरणीलीन होण्यासाठी प्रेरित करत आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे गट या पवित्र आध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही! Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »