News Bharati

Maharashtra

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द […]

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड! Read More »

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन – 2025’ (Agro vision 2025) या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप!

मुंबईच्या विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला ‘फ्युचर-रेडी इन्फ्रास्ट्रक्चर’ दृष्टिकोन आता मूर्त रूप धारण करत आहे.  याच धोरणांतर्गत, मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दुव्यावरील, अंधेरी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल  अंतिम टप्प्यात आहे.  हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून मुंबईकरांना सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या संपवणार आहे. असे म्हणले जाते. जुन्या

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श

मुंबई : शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत (Mumbai) राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श Read More »

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांनी थेट मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक धमकी

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील (MVA) मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसने मनसेशी युती करण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाविकास आघाडी मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेली महायुती (Mahayuti) विजयाची रणनीती आखत आहे. MVA मध्ये मनसेवरून मोठी फूट शरद पवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा Read More »

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज, २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ (Hutatma Smruti Din) म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास स्मृतिस्थळावर विधानसभा

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन Read More »

मुंबईकरांना अभूतपूर्व दिलासा! पुनर्विकासातील २०० चौ. फूट जागा वाढूनही नोंदणी फी माफ; फडणवीस सरकारचे दमदार पाऊल

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी तसेच भाडेकरूंना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवीन इमारतींमध्ये जागा मिळणाऱ्या भाडेकरूंसाठी नोंदणी शुल्क (Registration Fee) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला असून, याबाबतचे परिपत्रक (Circular) जारी करण्यात आले आहे.

मुंबईकरांना अभूतपूर्व दिलासा! पुनर्विकासातील २०० चौ. फूट जागा वाढूनही नोंदणी फी माफ; फडणवीस सरकारचे दमदार पाऊल Read More »