News Bharati

बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही भेट गणेश चतुर्थीच्या निमित्ताने झाली.पंतप्रधान मोदी आणि सीजेआय चंद्रचूड यांच्या या भेटीने राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा निर्माण केली आहे. काही जणांना हे संकेत देत आहे की, कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील संबंध कसे असावेत, दुसरीकडे, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट Read More »

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ

भारतीय सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो देशातील वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे.आता सर्व ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB-PMJAY) अंतर्गत मोफत उपचार घेऊ शकतील. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वांत मोठी लोक-निधीत स्वास्थ्य विमा योजना आहे जी १२ कोटी कुटुंबांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वास्थ्य कव्हरेज

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ Read More »

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड, प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी आणि इंदापूर तालुक्यातील बोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट देऊन, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा सखोल अभ्यास करावा. तसेच, भविष्यातील 50 वर्षांची गरज लक्षात

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला राहुल गांधींचा समाचार

देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. \”जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही,\” असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल बोलताना म्हणाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याचमुद्द्यावरून राहुल गांधींचा

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला राहुल गांधींचा समाचार Read More »

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर इथल्या परिचारिका आशा बावणे यांचा समावेश आहे. आशा बावणे यांची एकूण सेवा २८ वर्षे झाली असून ज यामध्ये २० वर्षे सेवा त्यांनी

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान Read More »

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार

अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्यशासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. \”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते२२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार Read More »

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंदकेल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७ हजारमोबाईल संचदेखील ब्लॉक केले आहेत. ‘संचार साथी’ च्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहितीमिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं. गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्यायादीत टाकलं आहे.

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि लाभ मिळालानसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्रमोदी झारखंडमधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही माहिती दिली. यासोबतच सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात लोक मोठ्यासंख्येने सहभागी होणार असून लाखो लोक ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता Read More »

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी एआय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे एआय कारखाने युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटरच्यानेटवर्कभोवती तयार केले जातील आणि स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधक यांना त्याचा लाभ घेतायेईल. याशिवाय हे ए आय कारखाने युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या ए आय उपक्रमांशी

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन Read More »