News Bharati

Team NB Marathi

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. या सोडतीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक दिग्गजांची गणिते बिघडली आहेत तर काहींसाठी नवीन संधीची दारे उघडली आहेत. यावेळच्या आरक्षण सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निम्म्याहून अधिक शहरांचा कारभार आता महिलांच्या हाती […]

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण Read More »

‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का?

नैतिकता, सत्य आणि जनहित या मूल्यांवर उभी राहिलेली पत्रकारिता आज एका गंभीर वळणावर उभी आहे. माहिती देणे हे ज्यांचे मुख्य कर्तव्य होते, ती माध्यमे आज ‘मतनिर्मिती’ आणि ‘दिशाभूल’ करण्याचे कारखाने बनली आहेत. लोकशाही बळकट करण्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याच्या या प्रवृत्तीचा वेध घेणारा हा विशेष लेख. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत पत्रकारितेचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. १८३२ मध्ये

‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का? Read More »

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत ‘महाविकास आघाडी’ला नाकारले असले, तरी दुसऱ्या बाजूला या निवडणुकांमधून समोर आलेले एक भयावह चित्र राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात कट्टरपंथी मुस्लिम पक्षांचा आणि उमेदवारांचा झालेला उदय

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट Read More »

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय, हे या निवडणुकीने आरशासारखे स्वच्छ केले. केवळ युतीचे गणित किंवा संघटनात्मक विस्कळीतपणा एवढेच हे मर्यादित नसून, काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणातील ढोंगीपणा आणि दिशाहीनतेचा हा अटळ परिणाम आहे.

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे Read More »

“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो”

“समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत ते ओळखून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कार्यक्षेत्रात काम करायचे म्हणून नव्हे, तर समाजाच्या गरजांवर आधारित काम उभे केले पाहिजे. निःस्वार्थीपणे काम उभे करणाऱ्याच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो,” असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्या साधिका प्रव्राजिका विशुद्धानंदा तथा भारतीताई ठाकूर यांनी व्यक्त केला.  पुण्यात नातू फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीताई

“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो” Read More »

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शादाब रियाज शेख जेरबंद : १ किलोचा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बाबुरावनगर परिसरातून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार याची किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर),

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त Read More »

मातीचा ब्रँड-ब्रँडची माती

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर उभ्या केलेल्या कपोलकल्पित \”ठाकरे ब्रँड\” च्या जोरावर \”मुंबई आमचीच\” \”महापौर आमचाच\” म्हणून गमजा मारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या त्या तथाकथित \”ठाकरे ब्रँड\”ची. मुंबई महानगरपालिका २०२६ निवडणुकीत मुंबईकरांनी अक्षरशः माती करून टाकली. उद्धव ठाकरे यांना १६० पेक्षा जास्त जागा लढवून त्यापैकी ६५ तर राज ठाकरे यांना ५२ पैकी अवघ्या ६ जागा जिंकता

मातीचा ब्रँड-ब्रँडची माती Read More »

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी … 

 उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईचा महापौर हिंदूच होणार, तोही मराठीच होणार आणि विकास—या तीनच विषयांभोवती ही निवडणूक फिरते आहे. हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या भारतीय जनता पक्षाचा व पर्यायाने महायुतीचा पराभव करण्यासाठी मुंबईचा मुसलमान मतदार डावपेच आखून मतदान करणार हे उघड आहे. लंडन आणि न्यूयॉर्कच्या पाठोपाठ मुंबईचा महापौर मुसलमान व्हावा यासाठी

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी …  Read More »

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”

‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,”   अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही” Read More »

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे यासारख्या २८ शहरांमध्ये मतदार तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार मतदान करत आहेत. ही पद्धत पारंपरिक ‘एक प्रभाग–एक नगरसेवक’ या मॉडेलपासून वेगळी आहे. या बदलामुळे मतदानाच्या दिवशीची प्रक्रिया बदलते. या शहरांतील मतदारांना एका मतदान केंद्रावर एकाच भेटीत तीन किंवा चार स्वतंत्र मते नोंदवावी लागतात. महाराष्ट्रातील महानगरपालिकेसाठी

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान? Read More »