News Bharati

मनसे

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव […]

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लावलेल्या हजेरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा Read More »

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. \”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,\” अशा बोचऱ्या

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात Read More »

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून, \”ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना वाईट वाटतेय आणि त्यातूनच

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

मातीचा ब्रँड-ब्रँडची माती

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर उभ्या केलेल्या कपोलकल्पित \”ठाकरे ब्रँड\” च्या जोरावर \”मुंबई आमचीच\” \”महापौर आमचाच\” म्हणून गमजा मारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या त्या तथाकथित \”ठाकरे ब्रँड\”ची. मुंबई महानगरपालिका २०२६ निवडणुकीत मुंबईकरांनी अक्षरशः माती करून टाकली. उद्धव ठाकरे यांना १६० पेक्षा जास्त जागा लढवून त्यापैकी ६५ तर राज ठाकरे यांना ५२ पैकी अवघ्या ६ जागा जिंकता

मातीचा ब्रँड-ब्रँडची माती Read More »

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल. मंत्रालयात होणार फैसलानगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी)

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत Read More »

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे विंदा करंदीकरांच्या \”तेच ते आणि तेच ते\” या कवितेसारखे होते. \”मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव\” १९६६ पासून वाजवून वाजवून

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते! Read More »

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे

अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत \”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरुन आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत.\”  असे वक्तव्य केले आहे.

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे Read More »