News Bharati

महामुंबई

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा

लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या […]

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा Read More »

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल

मुंबई हे देशातील सर्वांत जुने आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. या शहरातील अनेक इमारती स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. या इमारतींमध्ये पागडी पद्धतीने राहणारी हजारो कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत. पागडी पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र ही व्यवस्था आजच्या काळाशी सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे ती मुंबईसाठी गंभीर समस्या ठरली आहे. पागडी पद्धत ही एक जुनी भाडेप्रणाली आहे.

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल Read More »

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास

मुंबईत सण आले की शहराचं रूपच बदलतं. गणपतीचा गजर, ढोल-ताशांचा नाद, दहीहंडीची तयारी—या सगळ्यात मुंबईचा जीव आहे. या उत्सवांमधून आपली ओळख दिसते, आपली संस्कृती जिवंत राहते. पण या आनंदाच्या गडबडीत एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत असतो—आपलं घर सुरक्षित आहे का? आज मुंबईत हजारो कुटुंबं जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहतात. पावसाळा सुरू झाला की गळती, तडे,

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास Read More »

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर!

मुंबई : \”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर असून मराठी माणूस आपल्या कामात स्थिर आहे. त्यामुळे हे प्रश्न महाराष्ट्राचे नसून ठाकरे बंधूंच्या ढासळत्या राजकारणाचे आहेत,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर! Read More »

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो!

मुंबई : \”मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार आहोत. १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, १६ तारखेपासून तुमच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो! Read More »

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »