News Bharati

Maharashtra

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या […]

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना मानवंदना म्हणून आजचा संपूर्ण अर्थसंकल्प त्यांना समर्पित करण्यात आला आहे. \”राज्याच्या तिजोरीवर आणि प्रशासनावर वचक ठेवणारी शिस्त ही दादांची ओळख होती, त्यांचा हा वारसा आता स्मारकाच्या

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा Read More »

शेतकरी सुखावला : कर्जमाफी, विमा आणि तंत्रज्ञानावर भर; पहा अर्थसंकल्पातील मोठे निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफी आणि सवलतींचे स्वरूप २ लाखांची कर्जमाफी:

शेतकरी सुखावला : कर्जमाफी, विमा आणि तंत्रज्ञानावर भर; पहा अर्थसंकल्पातील मोठे निर्णय Read More »

नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस

मुंबई : अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हनुमान गढी परिसराचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या परिसराच्या विकासासाठी १२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. \”हनुमान गढी परिसर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता, एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे,\” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस Read More »

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे. कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार Read More »

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा

मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. \”जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे या परिसराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा,\” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या १७० कोटी रुपयांच्या

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा Read More »

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या प्रस्तावित विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. फसवणूक, आमिष किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला लगाम

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड Read More »

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी भाजप नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Read More »

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!

महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि ‘हजूर साहिब’ या नावाने खालसा पंथाच्या पाच तख्तांपैकी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले. गुरु गोविंद सिंगजींनी याच मातीत ‘गुरु ग्रंथ साहिब’ या पवित्र ग्रंथाला ‘अंतिम आणि जिवंत गुरु’ म्हणून

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध! Read More »

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी…. Read More »