News Bharati

मुंबई

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक…

मुंबईच्या फोर्ट भागात दिमाखात उभी असलेली, ग्रीको-रोमन स्थापत्यशैलीची ती पांढरीशुभ्र वास्तू म्हणजे केवळ पर्यटकांच्या फोटोग्राफीचे ‘बॅकड्रॉप’ नाही. त्या भव्य पायऱ्यांच्या मागे आपल्या अडीचशे वर्षांच्या बौद्धिक अस्मितेचा, ज्ञानाचा आणि इतिहासाचा एक सुवर्णकाळ दडलेला आहे. पण आज त्याच १८०४ साली स्थापन झालेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायरीतळावरून आत डोकावले, की जे चित्र दिसते ते वैभवाचे नाही […]

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक… Read More »

पुन्हा घुसखोरी..

मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ

पुन्हा घुसखोरी.. Read More »

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता थेट ‘नवी मुंबई’ महानगरपालिका क्षेत्रातही ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून बनावट जन्म दाखले जारी करण्याचे नवीन रॅकेट सोमय्या यांनी समोर आणल्याने सुरक्षा यंत्रणा

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३

पर्यावरणपूरक (Eco Friendly) गणेशोत्सव या ३ लेखांच्या लेखमालेतील पहिल्या २ लेखांमध्ये आपण शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्तीचे फायदे व तोटे पाहिले… आजच्या या ३ऱ्या व अंतिम लेखात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल त्याच्या पर्यायांवर विचार करू… एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी… अपवादात्मक स्थिती सोडल्यास कोणत्याही परिस्थितीत पीओपीच्या मूर्ती नकोच… हाच निष्कर्ष निघतो… तसेच

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २

गेल्या पहिल्या भागात आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहिले… आजच्या या दुसऱ्या भागात आपण पीओपी (PoP) मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहू… प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती (विशेषतः गणेशमूर्ती) त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलक्या, आकर्षक आणि आकाराने सुबक असतात… पीओपीला हवा तसा आकार देणे सोपे असते… तसेच त्यांना रंगाचा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १

ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १ Read More »

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती, राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा देशासमोरील नेहमीच एक चिंतेचा विषय राहिला आहे. मे २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. विशेषतः मुर्शिदाबाद आणि हावडा जिल्ह्यातील बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या प्रकरणांनी देशाचे लक्ष वेधून घेतले. परंतु, या प्रकरणातील संशयित आरोपींनी

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या Read More »

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते  विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे Read More »

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक

जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणात एक मोठा बदल घडून येत आहे. अमेरिकेच्या व्यापारी दबावातून मुक्त होण्यासाठी ४० मध्यम शक्तीच्या देशांनी (Middle Powers) आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कॅनडाचे वित्तीय धोरणकर्ते मार्क कार्नी यांनी या देशांना एकत्र आणून ‘डेमोक्रॅटिक कॉमर्स अलाईन्स’ (DCA) ची स्थापना केली आहे.

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक Read More »