News Bharati

भाजप

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दमदार सलामी दिली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील यशाची परंपरा कायम राखत, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने राज्यातील तीन वेगवेगळ्या महापालिकांमध्ये मिळून ‘विजयाचा चौकार’ ठोकला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महापालिकेत भाजपचे एकूण ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १. कल्याण-डोंबिवली: दोन महिला उमेदवारांची बाजीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) भाजपने दोन […]

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध! Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध!

कल्याण/डोंबिवली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक अशा दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. १. प्रभाग २६ (क): आसावरी नवरेडोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध! Read More »

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३० डिसेंबर) चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अनेक दिवसांच्या रस्सीखेच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबईतील एकूण

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार Read More »

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ‘बूथ’ स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंतच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बड्या नेत्यांचे मार्गदर्शनया बैठकीला भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री (संघटन)

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? Read More »

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, \”मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला Read More »

निवडणूक MM नाही HMचं होणार…

उबाठा-मनसे युतीच्या घोषणेने भारावून गेलेला लाचार सेनेचा एक सैनिक… (आपण त्याला मर्द मावळा म्हणू…) भेटला… विधानसभा निवडणुकीनंतर पार ढेपाळलेला हा गडी युती झाल्यापासून सत्तरीच्या म्हाताऱ्याने व्हायेग्रा खाऊन तरतरीत व्हावे… तशा टणाटण उड्या मारत होता… त्याचा एकच धोशा चालला होता… आता एमएम… MM आमचाच… आता एमएम… MM आमचाच… मी MM म्हणजे मुंबईचा मेयर समजलो… म्हटलं MM

निवडणूक MM नाही HMचं होणार… Read More »