News Bharati

Vinayak A

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा रंगली ती मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ ची, जिथे भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. […]

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात Read More »

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले! Read More »

ठाण्यात शिंदे सेनेचा धमाका! प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘क्लीन स्वीप’; चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने (शिंदे सेना) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिंदे सेनेने ‘क्लीन स्वीप’ देत चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग १९ मधील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते:या प्रभागातून शिवसेनेचे (शिंदे सेना) चारही

ठाण्यात शिंदे सेनेचा धमाका! प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘क्लीन स्वीप’; चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी Read More »

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज, १६ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, काही क्षणांतच अधिकृत कौल हाती येणार आहे. मुंबई महापालिकेत ‘काटे की टक्कर’मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात Read More »

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग

मुंबई : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना मार्कर पेनने बोटावर लावलेली शाई सहज पुसली जाते, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बोगस मतदान किंवा दुबार मतदानची भीती व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष नेते, विशेषतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर तीव्र टीका केली आहे. काही ठिकाणी व्हिडीओ व्हायरल झाले ज्यात

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग Read More »

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन Read More »

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास!

गंगाखेड : नांदेड येथे आगामी २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, समाजातील विविध स्तर आणि भाविकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि धर्म जागरण विभाग यांच्या वतीने एका विशेष डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास! Read More »

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हायस्कूल) येथील केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे कर्तव्यच!मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले,

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन Read More »