News Bharati

Team NB Marathi

गुणी च गुणरागी च… छत्रपतींचा पुतळा इस्राएलमध्ये! 

शनिवार, ०६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभा करण्याची घोषणा झाली आहे. इस्रायलचे मुंबईतील कॉन्सल जनरल (वाणिज्यदूत) यानिव रेवाच यांनी एका ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सहकार्य मागितले व ते त्यांनी तात्काळ देऊ केले असाही उल्लेख आहे. कौन्सल जनरल यांनी ट्विटचा शेवट ‘जय […]

गुणी च गुणरागी च… छत्रपतींचा पुतळा इस्राएलमध्ये!  Read More »

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं. देशमुखांचं घर असंच मोठं होतं. पाच भावंडं. प्रत्येकाचं शिक्षण, संसार, नोकरी, शहरं वेगवेगळी. कोणी पुण्यात, कोणी नाशिकला, कोणी मुंबईत, कोणी नागपुरात. धाकटा भाऊ शरद पुण्यात स्थायिक झाला होता. पण सगळ्यांची पाळंमुळं

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही! Read More »

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात

आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून आता दप्तराकडे केवळ ‘वजन’ या दृष्टिकोनातून न पाहता त्याकडे पर्यावरणीय जाणिवांचा निर्देशांक’ म्हणजेच ‘ग्रीन स्कोअर’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. दप्तराचा ग्रीन स्कोअर म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरातील

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात Read More »

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग

पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई, तापमानवाढ आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखी संकटे आज संपूर्ण जगासमोर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या \”पंच परिवर्तन\”

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग Read More »

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज

आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच समोर आलेली मुंबईतील गर्भपाताची आकडेवारी, विनयभंगाची वाढती प्रकरणे आणि कोल्हापूरचे सामूहिक बलात्काराचे प्रकरण या घटना केवळ कायदा-व्यवस्थेपुढील आव्हान नसून आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर लक्षणे आहेत. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज Read More »

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल

दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक गडद होत चालले होते. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय- ‘विसर्जित पीओपी मूर्तींपासून पुन्हा नवीन मूर्ती आणि स्टडी टेबल यांसारख्या विविध वस्तू बनविणे’-

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल Read More »

समतोलाचा सुवर्णमध्य : मराठा समाजाच्या सवलती आणि आव्हानांचे क्षितिज

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) मिळणाऱ्या शैक्षणिक आणि आर्थिक सवलती लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पटलावर एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात कमालीचा संवेदनशील, व्यापक आणि काहीसा जटील बनला आहे. एकीकडे मराठा समाजाचे आंदोलन पूर्ण आणि हक्काच्या अशा कायदेशीर आरक्षणासाठी सुरू

समतोलाचा सुवर्णमध्य : मराठा समाजाच्या सवलती आणि आव्हानांचे क्षितिज Read More »

महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे!

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गनिमी कावा’ आणि ‘राजकीय खेळी’ या शब्दांना वेगळाच संदर्भ आहे. पण अलीकडे राज्यातील विरोधकांनी, म्हणजेच महाविकास आघाडीने या शब्दांचा इतका सुमार आणि बेसुमार वापर केला आहे की, आता त्यांच्या बोलबच्चनी गर्जना ऐकताना नागरिकांना जांभया येतात. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले, तेव्हा मविआच्या नेत्यांचे चेहरे आणि

महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे! Read More »

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!

पुस्तक परिक्षण भारताची लोकशाही व्यवस्था संविधान, कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर उभी आहे. तथापि, या लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी विविध अंतर्गत सुरक्षा आव्हाने उभी राहिली आहेत. त्यापैकी नक्षलवाद आणि माओवादी चळवळ ही सर्वाधिक गुंतागुंतीची समस्या मानली जाते. या पार्श्वभूमीवर लेखक भरत आमदापुरे यांनी लिहिलेले \”शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!\” हे पुस्तक

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला! Read More »

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस Read More »