News Bharati

राजकीय

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे […]

अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे. आता या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय?सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ३१ जानेवारी

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर Read More »

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : \”ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासाचा ‘रोडमॅप’ सादर करत आगामी पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचे

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न

मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या ३० वर्षांतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, \”मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार आहेत,\” असा गंभीर

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न Read More »

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून!

\”एकेकाळचा वाघ ते आजची अवस्था… निष्ठेच्या नावाखाली नेमकं काय वाढून ठेवलंय? कट्टर शिवसैनिकाचे झालेल्या अध:पतनाचा हा प्रवास. निष्ठा आणि राजकारणाच्या नावाखाली झालेली शिवसैनिकाची अवहेलना याचीच ही लेखमाला!\” १) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ २) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ ३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ ४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ ५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून! Read More »

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत \”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरुन आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत.\”  असे वक्तव्य केले आहे.

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे Read More »

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात Read More »

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंवर केला. अंधेरी येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप नेते आणि मुख्यमंत्री मुंबईत जन्मलेले नसल्याने त्यांना मुंबईच्या प्रश्नांची माहिती नाही, अशी टीका

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे.

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »