News Bharati

बातम्या

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. एका कारमधून झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि तीन जवळच्या वाहनांमध्ये पसरली आणि जागीच जळून खाक झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा […]

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट Read More »

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भगवान बिरसा कलासंगम‘ राज्यस्तरीय कार्यक्रम कोकण विभागात उत्साहात संपन्न झाला. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातील ४७ जनजातींच्या महान संस्कृती आणि श्रेष्ठ कला परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता Read More »

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर

महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी देशाच्या समुद्री शक्तीचा केंद्रबिंदू बनत असून जेएनपीटी, बॉम्बे पोर्ट यांसह लहान बंदरांचे वाहतुकीतील वाढते योगदान उल्लेखनीय आहे. आधुनिक पायाभूत सुविधा तसेच, वेगवान दळणवळणामुळे महाराष्ट्राची भारताच्या जागतिक व्यापारातील महाशक्तीकडे होणारी वाटचाल ही सर्वस्वी थक्क करणारीच असून त्यात महाकाय वाढवण बंदराची भर म्हणजे दुधात केशर.. वाढवण बंदर हा प्रकल्प फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर Read More »

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड.. 

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे कारस्थान कोणी रचले, राज्यघटनेच्या आत्म्याशी कोणी प्रतारणा केली हे जगजाहीर असताना काँग्रेसने उठसूठ देशाच्या वाढलेल्या कर्जावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे. अनेक वर्षे निरंकुश सत्तेचा मदांध आस्वाद घेतल्यानंतर सत्तांतराच्या रूपाने विरोधी बाकांवर बसणे भाग पडल्यामुळे माजी सत्ताधारी कसे बावचळून जातात, याचे दर्शन आपल्याला काँग्रेसकडे पाहून कळून येते. आज जगात चौथ्या क्रमांकावर

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड..  Read More »

गाझा’साठी बनावट क्राउडफंडिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई महाराष्ट्रातून ३ जणांना अटक

महाराष्ट्रातील भिवंडी शहरात एका अत्यंत धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत, गाझामधील युद्धपीडितांच्या मदतीच्या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपये जमवणाऱ्या तीन तरुणांना भिवंडीतून अटक करण्यात आली आहे. वरवर पाहता हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाटत असला तरी, हा एक आंतरराष्ट्रीय कट असून, त्याचा थेट संबंध राष्ट्रीय

गाझा’साठी बनावट क्राउडफंडिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई महाराष्ट्रातून ३ जणांना अटक Read More »

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी Read More »

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी Read More »

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केलेल्या निवेदनात त्यांनी जनजाती समाजाच्या अस्मिता, संस्कृती आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे  Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत.. Read More »

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार

जनजाती कल्याण आश्रमच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्याकडून एैकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन याचा उपयोग सामाजिक कामात झाल्याचे सांगतानाच बारीपाड्याचा विकास कसा कसा होत गेला याचीही माहिती चैत्राम पवार यांनी या कार्यक्रमात दिली. जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधने हे पाच मुख्य घटक धरून बारीपाडा

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार Read More »