News Bharati

बातम्या

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांच्या […]

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच! Read More »

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महापौर ज्योती

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा Read More »

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्रला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारीच्या विलीनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे. \”अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली असती\”विलीनीकरणाच्या दाव्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं Read More »

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘The Great Indian Kapil Show’ सध्या जगभरात चर्चेत आहे. मात्र, या शोच्या आगामी भागावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार, मंत्री नितेश राणे यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या या शोमधील सहभागावर तीव्र आक्षेप घेत शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले Read More »

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न Read More »

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

नवी मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक Read More »