News Bharati

संस्कृती

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच  इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील […]

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती  Read More »

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन नक्षलवादी’ गटाचे लक्ष ठरते आहे. विचारवंतांच्या नावाखाली, कलाकारांच्या गाण्यांमध्ये, आणि सामाजिक आंदोलकांच्या घोषणांमध्ये  ही मंडळी वारीचा उपयोग लोकमत निर्माण करण्यासाठी, सरकारविरोधात भडकावण्यासाठी आणि पारंपरिक श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठी करत आहेत. संत परंपरेचा

वारीवरील आक्रमण Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही एकच आहेत असे मानण्यात येते. त्यांच्या एकत्वाची पूजा इथे श्रीविठ्ठल स्वरुपात केली जाते.  संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात याविषयी म्हणतात,  हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥एक एकाचे हृदयीं । गोडी

 वारी समाजपरिवर्तनाची  Read More »

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, बारव, विहिरी, पूल, रस्ते आणि वसाहती ही त्यांच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या समाजसेवेची साक्ष आहेत. अहिल्यादेवींच्या कार्यात धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता, आर्थिक समतेचा आग्रह, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि लोककल्याणाची निःस्वार्थ

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन Read More »

भारत गौरव योजना: संस्कृतीची पुनरुज्जीवन यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने सुरू केलेल्या “भारत गौरव पर्यटक रेल्वे” योजनेचा उद्देश भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक पातळीवर मांडणे आणि देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे हा आहे. ही योजना भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक राष्ट्राभिमान प्रेरित उपक्रम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

भारत गौरव योजना: संस्कृतीची पुनरुज्जीवन यात्रा Read More »

वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ

वर्धमान महावीर (Bhagwan Mahavir) हे जैन (Jain) संप्रदायाचे अंतिम म्हणजेच चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये बिहारमधील कुंडग्राम येथे एका राजघराण्यात झाला. लहानपणापासूनच ते करुणामय आणि मौनप्रिय होते. पालकांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज वैभवाचा त्याग केला. आत्मज्ञानाच्या शोधात संन्यास घेतला. बारा वर्षे कठोर तपश्चर्येनंतर शालवृक्षाखाली ध्यान करताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर ते ‘महावीर’;

वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ Read More »

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’

चित्रप्रदर्शनीतून उलगडला ‘वंदे मातरम्’चा इतिहास ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे केवळ दोन शब्द नाहीत तर भारतीय नागरिकांसाठी हा एक मंत्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देताना क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठी ‘वंदे मातरम्’ हाच मंत्र होता. म्हणूनच या गीताचे ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ असे समर्पक वर्णन महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे.

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’ Read More »

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी

सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखी परंपरा मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावात साजरी होणारी होळी श्रद्धा, समरसता आणि हिंदू एकतेचे प्रतीक आहे. येथे पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन भाजलेली ‘बट्टी’ काढणारे तरुण श्रद्धेची ताकद दाखवतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जातीयता बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येतात आणि समरसतेची होळी साजरी करतात. हिंदू धर्मावर शतकानुशतके

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी Read More »

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण 

सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दसंपदेची देणगी दिली आहे. त्यांनी फारसी व इंग्रजी प्रभाव कमी करून मातृभाषेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशात उर्दू-फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषाशुद्धी केली होती, मात्र स्वराज्य क्षीण झाल्यावर ती चळवळ मंदावली. मराठीवरील पहिले आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या रूपाने आले. शिवरायांनी त्यास प्रतिकार केला. दुसरा हल्ला युरोपियन

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण  Read More »