News Bharati

Vinayak A

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का?

झ्युरिक : ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे […]

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का? Read More »

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज!

नांदेड : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ सोहळा २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेडमध्ये पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नांदेड नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून, देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज! Read More »

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. \”भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,\” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. \”चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,\” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला Read More »

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार!

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक ‘शहीदी समागम’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज होत आहे. या महासोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार! Read More »

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल. मंत्रालयात होणार फैसलानगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी)

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश!

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’ सज्ज झाला आहे. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश! Read More »

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी ‘महापौर’ कुणाचा? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगरसेवकांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्याने मुंबईत खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले असून, महायुतीमधील स्थैर्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फोडाफोडीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तरनिवडणुकीनंतर शिंदे

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स Read More »

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार Read More »

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला घातली आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात महायुतीने ११८ जागांनिशी काठावरचं बहुमत (मॅजिक फिगर ११४) गाठलं खरं, पण सत्तास्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. यामुळेच आता शिंदे

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? Read More »

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ‘मुंबईचा महापौर कोण होणार?’ या प्रश्नाकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \”वरच्या देवानेच ठरवलंय…\”मुंबईच्या महापौरपदाबाबत

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान Read More »