News Bharati

Maharashtra Culture

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल. या सोहळ्याचे खास […]

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो Read More »

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन Read More »

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन

लातूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी लातूर येथे संपन्न होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला अध्यात्मिक ज्ञानाचा आणि भक्तीपरंपरेचा मार्ग

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन Read More »

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा Read More »

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली

मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने आणि ठसकेबाज गायकीने लावणीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “सोळावं वरीस धोक्याचं\” या विशेष स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि अजरामर लावण्या गायल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या याच लोकप्रिय रचनांचे सादरीकरण

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली Read More »

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास

माणूस जेव्हा आपली मातृभूमी सोडतो, तेव्हा तो केवळ भौगोलिक सीमा ओलांडत नाही, तर आपल्या आठवणी, घरे आणि शतकानुशतके जपलेला वारसा मागे सोडतो. अशा वेळी आपली मुळे, आपले संस्कार आणि पूर्वजांची संस्कृती विसरणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे हे एका महायुद्धापेक्षा कमी नसते. सिंध प्रांतातून, म्हणजेच आजच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाने हीच कठीण गोष्ट शक्य

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास Read More »