News Bharati

मुंबई

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.   यावेळी चव्हाण […]

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश Read More »

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका  उबाठा गट आणि मनसे या दोन पक्षांचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न Read More »

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. \”मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?\” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’ Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून,

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »

राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! \”मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;\” देवेंद्र फडणविसांचे विधान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात विविध आव्हानांचा समर्थपणे सामना केल्याचे ठामपणे सांगितले. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रितपणे निर्णय घेत असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, \”वर्षानुवर्षे निवडणुका न झाल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, आता

राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! \”मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;\” देवेंद्र फडणविसांचे विधान Read More »

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\”

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून महायुती आणि भाजपवर मराठी माणसाच्या प्रश्नावरून करण्यात आलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ‘सामना’चा अग्रलेख तथ्यांवर आधारित नसून, केवळ ‘द्वेष, भ्रम आणि राजकीय अपप्रचारावर’ आधारित असल्याचा आरोप केला आहे. ‘तुम्हीच केले मराठी माणसाला बेघर’ नवनाथ बन यांनी ठाकरे गटावर

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\” Read More »

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण

नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण Read More »

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांची सदिच्छा भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा झाली. \”अमितभाईंच्या भेटीतून नेहमीच

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट Read More »

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »