News Bharati

पुणे

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला…

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांना लाभलेली लयबद्ध साथ आता स्मृतींत विसावली काही ताल आणि काही लय अशा असतात ज्या जनमानसाच्या स्मृतीचाच एक अविभाज्य भाग बनतात. पुण्यात अनेक पिढ्यांसाठी एक दृश्य जणू शाश्वत होते: समोर श्रोत्यांचा अथांग सागर, मध्यभागी पंडित भीमसेन जोशी यांचा तुकाराम किंवा नामदेवांच्या अभंगात रंगलेला स्वर आणि त्यांच्या बाजूला हातात टाळ घेऊन बसलेले […]

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला… Read More »

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.  भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर:

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश! Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »