News Bharati

संस्कृती

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज

मी मागच्या वेळी वाराणसीला गेलो होते, तेव्हा मनात खूप उत्सुकता होती. नवीन ‘कॉरिडॉर’चे काम नुकतेच पूर्ण झाले होते. जमीन संपादनाबाबत मी अनेक गोष्टी वाचल्या होत्या. तिथे अनेक छोटी मंदिरे सापडली होती. काही अडचणी नक्कीच आल्या असतील, पण त्या चांगल्या प्रकारे सोडवण्यात आल्या. काशी विश्वनाथ मंदिर अनेकदा पाडले गेले आणि पुन्हा बांधले गेले. हे मंदिर शतकानुशतके […]

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’

कोल्हापूर : बारा बलुतेदारांच्या समृद्ध परंपरांना उजाळा देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात देशातील १७ राज्यांमधून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त २००

कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ Read More »

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ

कोल्हापूर : श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यासाठी येतात. या भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने यंदा ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून, सुमारे २ लाख भाविकांना अहोरात्र महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ Read More »

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीने गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी शहरातून प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. व्याख्यानातून रामचरित्राचा जागरउत्सवाचे औचित्य साधून २३ आणि २४ मार्च रोजी शहरातील सुमारे

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण Read More »

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ Read More »

धर्म आणि गोवंशाच्या रक्षणासाठी शंकराचार्यांची ‘चतुरंगिणी सेना’; २ लाखांहून अधिक सदस्यांचे उद्दिष्ट

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदू धर्म, शास्त्र, मंदिरे आणि गोवंश यांच्या संरक्षणासाठी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसी येथे ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या सेनेत देशभरातून एकूण २ लाख १८ हजार ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही सेना घटनात्मक मार्गाने धर्माचे कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धर्म आणि गोवंशाच्या रक्षणासाठी शंकराचार्यांची ‘चतुरंगिणी सेना’; २ लाखांहून अधिक सदस्यांचे उद्दिष्ट Read More »

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न

वाकड : \”सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,\” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न Read More »

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे \”भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६\” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद Read More »