News Bharati

Agriculture

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये […]

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट Read More »

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. ‘पीएम किसान’च्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी Read More »

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

मुंबई : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील जिओ

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन Read More »

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट

परळी : परळीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (१४ फेब्रुवारी) या प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत. पशुप्रदर्शन ऐतिहासिकया प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी,

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट Read More »

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन

पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor Acharya Devvrat) यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन Read More »

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!

नवी दिल्ली : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत (Sale of fake and low-quality fertilizers) वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश! Read More »

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘महाॲग्री-एआय धोरण २०२५-२९’ लागू केले आहे. या धोरणाने शेतीला आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत बनवण्यास सुरुवात केली असून डिजिटल ‘शेती शाळा’, ए. आय. चॅटबॉट, महाविस्तार ॲप, साथी पोर्टल, रिमोट सेन्सिंग, IoT (इंटरनेट ऑफ

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन Read More »