News Bharati

भाजप

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील […]

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक Read More »

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुखेड : \”ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुखेड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. तुम्ही फक्त २० तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, मुखेडच्या जनतेची आणि इथल्या प्रगतीची काळजी पुढची ५ वर्ष आम्ही घेऊ,\” असे आश्वासक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार विजया पत्तेवार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला!

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी भूकंपसदृश घडामोडी पाहायला मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सोलापूरचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांनीही ‘कमळ’ हाती घेतल्याने काँग्रेसला मराठवाडा आणि सोलापूर

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला! Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.   यावेळी चव्हाण

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश Read More »

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. \”मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?\” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’ Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून,

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले Read More »