News Bharati

संस्कृती

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले […]

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ या योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून नाशिकमधील रामकुंड परिसरासाठी महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर भर नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन Read More »

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास..

भारतातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने डबल इंजिन सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून महाराष्ट्रातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना हिंदुत्वनिष्ठ फडणवीस सरकारने

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास.. Read More »

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतही सार्वजनिक जीवनावर संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये, राष्ट्रीयता आणि पंथनिरपेक्षता यांचे अद्भूत सामंजस्य त्यांच्या ठायी दिसून येते. भारतात धार्मिक परंपरांनी आपल्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे,

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’ Read More »

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव..

‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्ति

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव.. Read More »

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता

भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि विविधता आपल्या जीवनात नेमकी कशी महत्त्वाची आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक जण ही विविधता जपतो असे असतानाही देश एकसंध कसा राहतो हे कौतुकात्पद आहे. भारताचा सांस्कृतिक वारसाकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारत शेकडो भाषा,

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता Read More »

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

\”ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असणे आवश्यकच आहे.स्वराज्याच्या रक्षणासाठी सुसज्ज, बळकट आरमार उभारण्याची गरज शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यामुळे स्वराज्याचे आरमार हा आजच्या आधुनिक भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे. आरमार

ज्याचे आरमार त्याचा समुद्र.. Read More »

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत 

भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण सामाजिक, राजकीय आणि नैतिक आचरणाचा एक दीपस्तंभ आहे. त्याचं महत्त्व केवळ एका ‘प्राचीन ग्रंथा’पुरते मर्यादित नाही; आज ते एक जिवंत राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून आपल्यासमोर उभे आहे. जे भारताच्या

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत  Read More »

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे ‘संत संमेलना’चे (SANT SAMMELAN) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात हे संमेलन होणार आहे. हे संमेलन समाजातील विसंगती दूर करून श्रद्धा, नैतिकता आणि त्याग यांसारख्या मूल्यांवर आधारित जीवन

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन Read More »

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव

१८९३ साल…शिकागो शहर… अमेरिकेच्या भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या प्रदर्शनाचा उत्सव साजरा होत होता. ‘वर्ल्ड कोलंबियन एक्सपोझिशन’च्या त्या भव्य झगमगाटात, जगाला अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा हा एक प्रयत्न होता. याच उत्सवाचा एक भाग म्हणून जागतिक धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं; वरवर पाहता सर्वसमावेशकतेचा आणि वैश्विक बंधुत्वाचा उदात्त हेतू समोर ठेवून. पण त्या भव्य मंचाच्या

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव Read More »