News Bharati

Vinayak A

१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षांसाठी प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे ही प्रवेशपत्रे मिळतील. शाळा आणि महाविद्यालये www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून ‘ऍडमिट कार्ड’ या लिंकद्वारे प्रवेशपत्रे डाउनलोड करू […]

१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध Read More »

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई; मांजा वापर टाळण्यासाठी जनजागृती करा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : नायलॉन मांजाच्या (Nylons Manja) वापरामुळे राज्यातील काही भागांत नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, आणि काही प्रकरणांत तर जीवितहानीही झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) यांनी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजाची विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई; मांजा वापर टाळण्यासाठी जनजागृती करा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश Read More »

केंद्रीय निधीच्या मदतीने महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सक्षम करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

मुंबई : केंद्र शासन आरोग्य (Health) व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवित असते. यासाठी कार्यक्रम कृती आराखडा (पीआयपी) अंतर्गत निधी राज्याला देत असतो. या निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य,

केंद्रीय निधीच्या मदतीने महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सक्षम करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव Read More »

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

मुंबई : एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन Read More »

मंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यात १ एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य

मुंबई : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग (FASTag) अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. फास्ट टॅग

मंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यात १ एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य Read More »

संकेत आणि भारती लोढा यांना पेटंट मंजुरी; हार्ट डिसीज व सर्व्हिकल कॅन्सरवर अभिनव संशोधन

पुणे : पुणे येथील संकेत लोढा आणि त्यांची पत्नी भारती लोढा यांनी भारताच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या दोन महत्त्वाच्या संशोधनांवर पेटंट मंजूर करून घेतले आहे. या संशोधनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) तंत्रज्ञानावर आधारित पोर्टेबल मशीन हृदयविकाराचे निदान करण्यासाठी आणि सर्व्हिकल कॅन्सरचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी पोर्टेबल डिव्हाइस यांचा समावेश आहे. ही दोन्ही उपकरणे आरोग्य क्षेत्रातील एक

संकेत आणि भारती लोढा यांना पेटंट मंजुरी; हार्ट डिसीज व सर्व्हिकल कॅन्सरवर अभिनव संशोधन Read More »

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद (Sant Samvad) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला विभागाच्या कामकाजाचा आढावा

मुंबई : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विभागाच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास केला. राज्यात डिसेंबर महिन्यात प्राप्त नियतनाच्या 92.09% धान्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुरवठा विभागाची

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला विभागाच्या कामकाजाचा आढावा Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी

मुंबई : आधार क्रमांक भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची ओळख बनले आहे. त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ‘युनिक आयडी’ (Unique ID) तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याच्या प्रारूपाकरीता एक समिती

मंत्रिमंडळ निर्णय : आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन Read More »