News Bharati

मुंबई महापालिका निवडणूक

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या संभाव्य युतीचे वर्णन ‘दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम’ असे केले होते. मात्र, भाजपने या विधानाचा समाचार घेत याला ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ असल्याचे म्हटले आहे. पराभवाच्या भीतीने केलेली सक्ती: केशव उपाध्येभाजपचे मुख्य […]

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. \”उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,\” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला. ‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे Read More »

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक Read More »

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. \”सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,\” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.   यावेळी चव्हाण

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश Read More »

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका  उबाठा गट आणि मनसे या दोन पक्षांचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न Read More »

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. \”मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?\” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’ Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »