News Bharati

राजकीय

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार

राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते. छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट  येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा […]

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार Read More »

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे

विरोधकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते त्यामुळेच काही झालं तरी ते राजकारणच करत आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने ते राजकारण करून जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण करीत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे काल नाशिक दौऱ्यावर आले होते.

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे Read More »

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत असे ठाम प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही. त्यानंतरही त्यांना काही

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान Read More »

रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली मोठी जवाबदारी

भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रावसाहेब दानवे यांना भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीती

रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली मोठी जवाबदारी Read More »

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात; जाती- जातीमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलाच सुनावलं. या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील माफी मागितली आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात; जाती- जातीमध्ये… Read More »

वक्फ बोर्ड : जेपीसीच्या बैठकीत वादावाद; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नोंदवले तरतुदींवर आक्षेप

वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी दुसरी बैठक घेण्यात आली. यात विरोधी पक्षाच्या खासदारांनी नवीन तरतूदींवर आक्षेप नोंदवत जोरदार वादावादी केली. तसेच काही काळासाठी सभात्याग करून निषेधही नोंदवला. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीच्या दुसऱ्या बैठकीत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या

वक्फ बोर्ड : जेपीसीच्या बैठकीत वादावाद; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नोंदवले तरतुदींवर आक्षेप Read More »

संजय राऊतांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; महिलेचे ईडी ला पत्र

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संजय राऊतांकडून वारंवार बलात्कार आणि जीवे मारण्याची धमक्या देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना

संजय राऊतांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; महिलेचे ईडी ला पत्र Read More »

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

अकोल्यातील भाजप पदाधिकारी तथा बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येउन हा चाकू हल्ला केल्याची माहिती आली आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता काल रात्री उशिरा त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केला. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला Read More »

शिवरायांच्या पुतळा कोसळण्यामागे वैभव नाईकांचा हात? – निलेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक ट्विट करून उबाठा गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केलेत. \”पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले. शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचा हात तर नाही ना?\”

शिवरायांच्या पुतळा कोसळण्यामागे वैभव नाईकांचा हात? – निलेश राणे Read More »

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री

 नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये केले. नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. https://twitter.com/mieknathshinde/status/1829564526582456459/photo/1

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री Read More »