News Bharati

Uddhav Thackeray

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना […]

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेट सदस्या शीतल देवरुखकर यांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघात मोठी तयारीही केली होती.

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश Read More »

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. \”मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे. केशव

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले Read More »

BMC Election 2026 : मनसेची पहिली यादी जाहीर; १५ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चे वाटप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि राजकीय समीकरणे गोपनीय ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’ (AB Form) देण्याचा निर्णय

BMC Election 2026 : मनसेची पहिली यादी जाहीर; १५ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चे वाटप Read More »

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता वेग धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आतापर्यंत कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, सुमारे ९० इच्छुकांना गुपचूप ‘AB’

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय?

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उबाठा गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर \”मुंबई तोडण्याचा प्रयत्न\” आणि \”भाजपने शिवसेनेला वापरून घेतले\” असे गंभीर आरोप केले. मात्र, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपांचा समाचार घेत उद्धव ठाकरेंचा ‘खोटारडेपणा’ पुराव्यासह उघड केला आहे. \”संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांच्या रक्ताने हात

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय? Read More »

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला Read More »

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’ Read More »

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र?

मुंबई : भाजपने मराठी अस्मितेचा खरा आवाज बनत ठाकरे बंधूंच्या युतीवर सवाल उपस्थित केले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील हेतूंवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मराठी जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी “मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला” अशी टीका

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र? Read More »

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. \”कधी इकडे, तर कधी तिकडे\” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे.

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे Read More »