News Bharati

BMC Election 2026

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल […]

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. \”मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना Read More »

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेट सदस्या शीतल देवरुखकर यांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघात मोठी तयारीही केली होती.

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश Read More »

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले होते, पण आता ज्या पद्धतीने पक्षात प्रवेश होत आहेत, त्यावरून ही संघटना आता ‘मामूंची पार्टी’ झाली आहे,\” अशा शब्दांत शेलारांनी निशाणा साधला

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला Read More »

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. \”मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे. केशव

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले Read More »

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ‘बूथ’ स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंतच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बड्या नेत्यांचे मार्गदर्शनया बैठकीला भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री (संघटन)

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? Read More »

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. \”आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया\” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर Read More »