News Bharati

महाराष्ट्र

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत!

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदनात सांगितले. महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे यूनेस्कोचे मानांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच […]

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत! Read More »

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला!

नागपूर : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला! Read More »

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले!

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतृत्वावर हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याचा थेट आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. प्राचीन हिंदू परंपरा ‘कार्तिगै दीपम’ (Karthigai Deepam) चालू देण्याच्या बाजूने निकाल देणारे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर (Impeachment Notice) उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले! Read More »

जगातील सर्वोत्तम संविधान ‘भारताचेच’ का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘सांस्कृतिक ऐक्यातून राजकीय ऐक्या’चा प्रवास!

नागपूर : \”भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती पाहिली तर भारतात सांस्कृतिक ऐक्य होते, पण राजकीय ऐक्य नव्हते, त्यामुळे सर्व लोकांना एका माळेमध्ये गुंफण्यांचे काम आपल्या संविधानाने केले. संविधान सभेत प्रत्येक अधिनियमावर उहापोह झाला, एक एक मुद्दयावर चर्चा झाली आणि त्यातून हे संविधान तयार करण्यात आले. त्यामुळे

जगातील सर्वोत्तम संविधान ‘भारताचेच’ का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘सांस्कृतिक ऐक्यातून राजकीय ऐक्या’चा प्रवास! Read More »

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – CM देवेंद्र फडणवीस Read More »

‘CSMT’ आपले अभिमानाचे स्थान!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पुनरावृत्ती!

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट

‘CSMT’ आपले अभिमानाचे स्थान!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पुनरावृत्ती! Read More »

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग!

नागपूर : काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचवून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य व‍िकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग! Read More »

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले गेले आहे. तब्बल ₹११५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. मेघना बोर्डीकरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार! Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »