News Bharati

महाराष्ट्र

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, \”काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,\” अशी घणाघाती टीका केली […]

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा! Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक फोटो शेअर करत, उद्या (बुधवारी) दुपारी १२ वाजता मोठ्या घोषणेचे संकेत दिले आहेत. मात्र, या ट्विटला भाजपने अत्यंत

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा! Read More »

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\”

मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. \”नंतर नगरसेवक पळवले जातील,\”

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\” Read More »

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!”

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या विजयाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!” Read More »

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या संभाव्य युतीचे वर्णन ‘दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम’ असे केले होते. मात्र, भाजपने या विधानाचा समाचार घेत याला ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ असल्याचे म्हटले आहे. पराभवाच्या भीतीने केलेली सक्ती: केशव उपाध्येभाजपचे मुख्य

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. \”उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,\” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला. ‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे Read More »

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, हा विजय म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ असल्याचे विधान केले आहे. भाजपची दुपटीहून अधिक झेपनिवडणुकीचे कल आणि निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा Read More »

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप

मुंबई : अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल या विधानांचा तीव्र निषेध करत ‘जोडेमार आंदोलन’ केले. ‘म्हातारचळ लागल्याची’ बोचरी टीका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार भातखळकर

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप Read More »