News Bharati

विशेष

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण

बस्तरच्या दंडकारण्यात गेली अनेक दशके दहशतीचे दुसरे नाव बनलेला आणि १ कोटींहून अधिक बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. मधल्या काळात पापाराव चकमकीत मारला गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तो आजही सशस्त्र नक्षलवाद्यांच्या तुकडीसह जंगलात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पापारावच्या […]

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण Read More »

जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है|

यावर्षी होळीला दिल्लीच्या उत्तम नगर परिसरातील जे जे कॉलनीतील ११ वर्षांची एक हिंदू मुलगी छतावर होळी खेळत होती. तिने खाली उभ्या असलेल्या तिच्या वडिलांवर मेमराज बटोलिया यांच्यावर रंगीत पाण्याने भरलेला फुगा फेकला. तो फुगा रस्त्यावर पडला आणि शेजारच्या कुटुंबातील एका मुस्लिम महिलेवर त्या फुग्यातील \”रंगीत\” पाणी उडाले. त्या मुलीच्या कुटुंबाने ताबडतोब त्या मुस्लिम महिलेची आणि

जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है| Read More »

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानहून प्रसिद्ध होणाऱ्या नवाईवक्त या वृत्तपत्राच्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ ई-आवृत्तीत शिर्षकात \”इरान पर हजारों कुर्दों का हमला\” अशी बातमी देऊन हे अमरिकी शाह म्हणजे अमेरिकेचे कारस्थान म्हटले आहे. कुर्दांना इराणविरुद्ध भडकवून अमेरिकेची CIA आणि इस्त्राएल यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचे षडयंत्र रचले आहे. असा इराणचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याला हे

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष Read More »

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI

गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी एक बातमी आली आहे. सोलापूरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) वतीने माजी आमदार नरसैय्या आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून, घोषणाबाजी करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आणि अमेरिका- इस्त्रालयच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करून इराणला पक्षाचे समर्थन असल्याचे सांगितले. त्याचवेळी

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची घोर अंधश्रद्धा

यावर्षी (२०२६) होळीच्या सणावर खग्रास चंद्रग्रहणाचे (Lunar Eclipse) सावटही पडले. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या गेल्या. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून आले. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. साधारणतः ग्रहण काळात काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई

अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची घोर अंधश्रद्धा Read More »

रमजान का महिना, मियां करे शोर!

रविवार, १ मार्च २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराचीच्या माई कोलाची रस्त्यावरील अमेरिकन दूतावासात अमेरिका व इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत जगभरातील शियापंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू (उलेमा) व इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेध आंदोलनाच्या वेळी अनेक निदर्शक जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी दूतावासात तोडफोड सुरू केली व आग लावली. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची

रमजान का महिना, मियां करे शोर! Read More »

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले.

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’

भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या विजयाचा इतिहास नाही, तर तो ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान आत्म्यांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली अनेक प्रकरणे आहेत, पण १७०४ सालच्या डिसेंबर महिन्यात सरहिंदच्या भूमीवर जे घडले, ते वाचताना आजही डोळ्यांत पाणी येते आणि मस्तक आदराने झुकते. २६ डिसेंबर हा दिवस, जो भारत सरकारने ‘वीर बाल दिवस’

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’ Read More »

वंग – भंग.. ते .. ममतादीदी..

केरळ राज्याच्या ‘केरळम’ नामकरण करण्यास मोदी सरकारने मान्यता दिली आहे. केरळचे नाव बदलण्याचे सरकारने सांगितलेले कारण असे की, केरळ विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, खरं तर केरळचे नाव मल्याळम भाषेत केरळम् असे आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये त्याला केरळ असे म्हणतात. हे नाव बदलण्याचा उद्देश केरळ राज्याची ओळख, भाषा, संस्कृती आणि विकासाला चालना देणे हा आहे.

वंग – भंग.. ते .. ममतादीदी.. Read More »