News Bharati

Vinayak A

जरांगेंनी शस्त्र ठेवली खाली ??

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३ नोव्हेंबरला निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच, त्यांनी ४ नोव्हेंबरला सकाळी पत्रकार परिषदेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र त्याच वेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की निवडणूक लढणार नसले तरी ते उमेदवारांना समर्थन देणार नाहीत. जरांगे पाटील यांनी […]

जरांगेंनी शस्त्र ठेवली खाली ?? Read More »

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन… असे काहीसे चित्र सर्वच घरांत दिसून येत आहे. महायुती सरकारने भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी भेट

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली Read More »

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात…

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाऊबीज आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची पहाटेच्या वेळी भेट घेतली. आपण करत असलेल्या कामाची माहिती दिली तसेच भविष्यातील नियोजनाचा आलेख मांडला. सकाळच्या न्याहारीसह दिवाळी फराळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात… Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दक्षिण सोलापूर

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी Read More »

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देताना सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते.

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर Read More »

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास Read More »

हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – श्री गोविंददेव गिरी

हिंदू धर्म सर्वांबाबत समभाव मानणारा आहे. कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही. आजच्या परिस्थितीत मात्र हिंदू समाजाला एकत्र आणणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेव गिरी यांनी केले विश्व हिंदू परिषदेच्या पुणे महानगर विभागातर्फे स. प. महावि‌द्यालयाच्या लेडी

हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – श्री गोविंददेव गिरी Read More »

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केले. आता माघारीनंतर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने जोर चढेल. मात्र, त्याआधीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या गर्दीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. गावागावांतील कार्यकर्ते आमने- सामने आले असून, शक्तिप्रदर्शनाच्या

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’ Read More »

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून जवळपास 400 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी एकच दिवस आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तीन दिवसांत विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांना बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्यांच्या निवडणुका न झाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार Read More »

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे

महाराष्ट्राच्या राजकारणात काका व त्यांच्या पुतण्यांचेही राजकारण जोरात चालते. बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे, शरद पवार ते अजित पवार तसेच गोपीनाथ मुंडे ते धनंजय मुंडे यांचे राजकीय किस्से अन् सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पुतणे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे Read More »