News Bharati

Ravindra Chavan

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते हे मुख्यमंत्री […]

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी! Read More »

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ

मुंबई : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या अभियानाबद्दल माहिती देत हे अभियान राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ Read More »

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. \”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,\” अशा बोचऱ्या

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात Read More »

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुतांश जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने राज्यातील ग्रामीण भागावर आपली पकड पुन्हा

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा Read More »

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी \”जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते,\” अशा शब्दांत सुनावले आहे. विशेष म्हणजे, प्रत्युत्तर देताना चव्हाणांनी

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले! Read More »

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच आता नेत्यांच्या पेहरावावरूनही राजकीय युद्ध पेटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सभेत परिधान केलेल्या दाक्षिणात्य पेहरावावरून (लुंगी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. मात्र, या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत राऊतांना आरसा

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय? Read More »

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण

नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण Read More »

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) गटावर जोरदार टीका करत त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राक्षसाचा जीव पोपटात’ आणि हिंदुत्वाचे ढोंग रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. \”हिंदुत्वाच्या भगव्या ध्वजाला ‘फडकं’

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला Read More »

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांची सदिच्छा भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा झाली. \”अमितभाईंच्या भेटीतून नेहमीच

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट Read More »