News Bharati

Devendra Fadnavis

महिलांच्या सायबर छळवणुकीला बसणार आळा; कायद्यात होणार आवश्यक बदल?

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या (Cyber Stalking) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यात आवश्यक बदल करणार आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या (DGP) अध्यक्षतेखाली एक ‘विशेष समिती’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, माहिती […]

महिलांच्या सायबर छळवणुकीला बसणार आळा; कायद्यात होणार आवश्यक बदल? Read More »

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुनर्गठनाची पार्श्वभूमीयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुदत संपल्यानंतर, समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय Read More »

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. \”ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला. नेमका वाद काय?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर Read More »

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भाईंदर (ठाणे) : \”जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास महिला हाच विकासाचे दुसरे चाक असल्याचे स्पष्ट होते. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६’ मध्ये ते मुख्य उपस्थित म्हणून बोलत

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, माध्यमांनी देखील भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन Read More »

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन Read More »

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९ लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात केवळ पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे सव्वा लाख कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत आमूलाग्र बदल होणार आहे. नदीजोड प्रकल्प : दुष्काळी भागांसाठी वरदानराज्यातील पाणीटंचाई

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद Read More »

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा अर्थसंकल्प प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित असून राज्याला १ ट्रिलियन

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी Read More »

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या फडणवीसांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाचा कायापालट आणि मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा: ‘काँक्रीट रस्ते’ कनेक्टिव्हिटीग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना Read More »