News Bharati

Ajit Pawar

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती (जि. पुणे) आणि राहुरी (जि. अहिल्यानगर) या दोन महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असून, संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचे मुख्य वेळापत्रक अधिसूचना जारी […]

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल Read More »

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना मानवंदना म्हणून आजचा संपूर्ण अर्थसंकल्प त्यांना समर्पित करण्यात आला आहे. \”राज्याच्या तिजोरीवर आणि प्रशासनावर वचक ठेवणारी शिस्त ही दादांची ओळख होती, त्यांचा हा वारसा आता स्मारकाच्या

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा Read More »

अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”अजितदादा हे शब्दाला जागणारे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील गणिते काहीही असोत, पण क्षमतेचा विचार केला तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. दुर्दैवाने, एक सक्षम मुख्यमंत्री राज्याला मिळू शकला नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री

अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. \”महाराष्ट्राला एक अत्यंत सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता, असे नेतृत्व आज आपल्यात नाही. राज्याने खऱ्या अर्थाने एक न लाभलेला मुख्यमंत्री गमावला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांचा तो अचूक ‘टायमिंग’ आणि

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक Read More »

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:\”राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही Read More »

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी Read More »

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची आणि आमचीही इच्छा होती, मात्र आता या चर्चेत खंड पडला आहे,\” असे सूचक विधान पवारांनी केले

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\” Read More »

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. आज (३१ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजकीय हालचालींना वेग: ‘देवगिरी’वर खलबतंआज पहाटेपासूनच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी Read More »