देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार
सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री […]