News Bharati

संस्कृती

पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या पुण्यातील तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष आहे. या मंदिरातील श्रीरामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे. भर मध्यानीच्या उन्हात सर्वत्र पसरणारा सुवासिक फुले आणि सुगंधी दवण्याचा दरवळ, ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा गजर, ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणा, रामजन्माचे कीर्तन, चौघडावादनाच्या तालावर सुवासिनींनी म्हटलेला पाळणा, रामाच्या पोषाखाचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची […]

पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव Read More »

ऋणानुबंध साखरेच्या गाठीशी

गुढीपाडव्यासाठी गाठीची खरेदी आवर्जून केली जाते. गुढीसाठी गाठी हवीच. गाठींच्या निर्मितीची प्रक्रिया कशी असते, त्याची ही माहिती. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ या पं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरांतील नाट्यगीताची मोहिनी सर्वांना आहे. तसाच बाळगोपाळांपासून सर्वांचा साखरेच्या गाठीशी ऋणानुबंध जुळलेला आहे. नव्या आशा-आकांक्षा आणि नव संकल्पांची गुढी उभारून मोठ्या दिमाखात हिंदू नववर्षांची सुरुवात केली

ऋणानुबंध साखरेच्या गाठीशी Read More »

शिवरायांचे कर्तृत्व सांगणारी शिवसृष्टी

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीची ही ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि उत्तम प्रशासक होते. शिवाजी महाराजांची स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची भावना अतिशय जागरूक होती. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. शिवकालीन घटनांमुळे भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला.

शिवरायांचे कर्तृत्व सांगणारी शिवसृष्टी Read More »

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात ‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ हे शिवाजी महाराजांचे चरित्र एक लाख बालवाचकांच्या हाती देण्यात आले. पुणे पुस्तक महोत्सवात हा उपक्रम करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक मोहन शेटे यांचे त्यासंबंधीचे हे अनुभव कथन. २०२४ हे वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष ! त्या युगप्रवर्तक घटनेचे साऱ्या देशात उत्सवाप्रमाणे

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र Read More »

संत एकनाथ महाराज: शांतीब्रह्माची आध्यात्मनिष्ठ सामाजिक समरसता!

भारतीय समाजाला विचारांचे फार मोठे देणे संत एकनाथांनी दिले. संत एकनाथ महाराज षष्ठीनिमित्त त्यांच्या विचारांची ही ओळख.

संत एकनाथ महाराज: शांतीब्रह्माची आध्यात्मनिष्ठ सामाजिक समरसता! Read More »

रंगपंचमी ते धुळवड: सणांचा उलटा प्रवास

हल्ली लोक धुळवडीलाच रंगपंचमी समजू लागले आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजात गेली पंधरा वीस वर्षे हे बदल वेगात घडल्याचे मला जाणवते आहे.

रंगपंचमी ते धुळवड: सणांचा उलटा प्रवास Read More »

वैभवशाली संस्कृतीच्या खुणा

भारत पूर्वीपासून वैभवसंपन्न, समृद्ध आणि प्रगत देश होता. याचे अनेक दाखले इतिहासाच्या कुपीत बंद आहेत. भूतकाळाचा आढावा घेतला की आपल्या अवतीभवती असणारे अनेक संदर्भ आपल्यालाही आपल्या वैभवाची जाणीव करून देतात. त्यातूनच कोल्हापूर सारख्या छोट्या शहराचा रोम साम्राज्याशी असणारा संबंध उलगडतो. कोल्हापूरच्या टाऊन हॉल बागेमध्ये इतिहासाच्या या पाऊलखुणा प्रत्ययाला येतात. कोल्हापुरातल्या जुना बुधवार तालीम समोरून तोरस्कर

वैभवशाली संस्कृतीच्या खुणा Read More »

मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली, सादरही झाली. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावे लागेल. शहाजीराजे भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन

मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान Read More »

काठीची राजवाडी होळी

सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या वनवासी बांधवांसाठी काठीची राजवाडी होळी ही दिवाळीच असते. वनवासींच्या या आगळ्या-वेगळ्या आणि पारंपरिक सणाची ही ओळख.

काठीची राजवाडी होळी Read More »

ऋतुराज वसंत आणि भारतीय परंपरा भाग – २

अगदी प्राचीन काळापासून वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी या सर्व उत्सवांची लोकप्रियता बघून या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्यातली उत्स्फूर्त सहजता ठळकपणे दिसून येते. हे सगळे सण म्हणजे भारतीय संस्कृतीचे, तिच्या निसर्गप्रेरीत उत्सवी मानसाचे आरसेच आहेत. अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात.

ऋतुराज वसंत आणि भारतीय परंपरा भाग – २ Read More »