News Bharati

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. मंत्री श्री. लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

गत दोन वर्षात कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्ययुक्त व बेरोजगारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडवणार आहे, हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

\”विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंमरोजगार नोंदणी, प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\” असं यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *